‌‌राधानगरी धरण ८६ टक्‍के भरले | पुढारी

‌‌राधानगरी धरण ८६ टक्‍के भरले

‌राधानगरी ; पुढारी वृत्तसेवा ‌‌राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण ८६ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे साडेसहा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चार ते पाच दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

आज (सोमवार) सकाळी संपलेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात १५० मिमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर २५६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून खासगी वीजनिर्मितीसाठी १६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे.

‌धरणात ७१८७.०८ द.ल.घ.फु. इतका पाणी साठा असून, पाणी पातळी ३४१.१० फूट इतकी झाली आहे. 347.50 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते.

जोमदार व दमदार पडणाऱ्या पावसामुळे महापूर सदृश्य स्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भोगावती नदीपात्रात झपाट्याने वाढ झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button