औरंगाबादसाठी 500 कोटी मंजूर : पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी सन २२२२-२३ साठी ५०० कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
औरंगाबाद जिल्हातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व अन्य जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले होते. परिणामी या जिल्ह्याची वार्षिक योजना निधी ५०० कोटीपर्यंत वाढविण्यात आली आहे, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेच्यावतीने आभार मानले आहेत.
हेही वाचलं का ?