नगर : महागाईने सर्वसामान्य मेटाकुटीला : दीपाली ससाणे
श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव दीपाली ससाणे यांनी व्यक्त केले.
देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, तरुणांवर अन्याय करणारी अग्निपथ योजना, पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर दरवाढीमुळे देशातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून, याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असल्याचे ससाणे म्हणाल्या.
यावेळी मोदी सरकार विरोधात दीपाली ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने महिला
आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका संगीताताई मंडलिक, स्वातीताई छल्लारे, आशाताई परदेशी, दीपालीताई धनवटे, नागेश्वरी एडके, राणी देसर्डा, गुरमित चुग, गुरलित चुग, त्रिवेणी गोसावी, सविता अढांगळे, सुजाता बारगळ आदी महिला सहकारी उपस्थित होत्या.