जया बच्‍चन नातीला काय म्हणून गेल्‍या, “लग्नाशिवाय मुलं झाली तर…” | पुढारी

जया बच्‍चन नातीला काय म्हणून गेल्‍या, "लग्नाशिवाय मुलं झाली तर..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमुळे चर्चेत आल्या होत्या. जया बच्चन यांना फोटो काढणं अजिबात आवडत नाही; परंतु, एका कार्यक्रमादरम्यान एक फोटोग्राफर फोटो काढण्यास घाईने त्याच्याकडे गेला आणि पडला. या घटनेनंतर जया बच्चन यांनी त्याला उठवण्याऐवजी ‘एकदा नाही तर अजून चार वेळा पडायला पाहिजेस’ असे म्हणाल्या. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून त्यांनी चक्क नातीला ‘लग्नाशिवाय मुलं झाली तर मला काहीच प्रोब्लेम नाही’ असे वक्तव्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी त्याची नात नव्या नवेली नंदासोबत एक पोस्ट टविटरवर शेअर केली आहे. यात त्यांनी चक्क आमच्या काळात आम्ही काही गोष्टी करू शकलो नाही. तु मुक्त संचार करू शकतेस, लग्नाशिवाय मुलं झाली तर मला काहीच प्रोब्लेम असणार नाही, असे वक्तव्य नातीला सल्ला देताना केले. या वक्तव्याने जया या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

नातीशी बोलताना जया बच्‍चन  म्हणाल्या की, “आमच्या काळात आम्ही काही गोष्टी करू शकलो नाही, फक्त प्रेम आणि समायोजनावर नाते टिकू शकत नाही. आजच्या काळात फिजिकल अट्रक्शन खूप महत्त्‍वाचे आहे. कोणतीही व्यक्ती सौदर्यांवर प्रेम करते. सध्याची पिढी सर्व करते आणि त्यांनी हे करू नये किंवा ते करू नये? असे मला वाटत नाही. आताच्या पिढीने सर्व काही करावे अशी माझी विचारसरणी आहे. शारीरिक संबंधाशिवाय नाते फार काळ टिकू शकत नाही. उद्या माझी नातं नव्या नंदानेदेखील आजच्या पिढीला अनुसरून वागले पाहिजे. तिने लग्नाअगोदर मुलाला जन्म दिला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही”. या वक्तव्याने जया या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button