J&K : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ३ जवान शहीद; 2 दहशतवादी ठार | पुढारी

J&K : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ३ जवान शहीद; 2 दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाला काहीच दिवस असताना भारतीय लष्कराने दोन मोठे दहशतवादी हल्ले उधळून लावले आहेत. काल रात्री राजौरीपासून (जम्मू आणि काश्मीर ) २५ किलोमीटर अंतरावर भारतीय लष्कराच्या तळ परगल येथे हल्ला केला. हल्ल्यादरम्यान दोन्हीकडुन गोळीबार सुरु होता. यावेळी तीन जवान शहीद झाले तर दोन दहशतवादी  ठार झाले आहेत.

सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफलमॅन मनोज कुमार आणि रायफलमन लक्ष्मणन डी यांनी राजौरीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या लष्कराच्या कंपनीच्या तळावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना प्राण गमावले.

11 राष्ट्रीय रायफल बटालियनने दिलेल्या माहितीनुसार जम्मु-काश्मिरमधील राजौरीच्या परगल तळावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरु होता. यावेळी तीन जवान शहीद झाले तर दोन दहशतवादी  ठार झाले आहेत. लष्कराने सुमारे सहा किलोमीटर परिसराला वेढुन सर्च ऑपरेशन सुरु ठेवले आहे. त्याचबरोबर धरहल पोलीस स्टेशनपासून सहा किलोमीटरच्या परिसरात लष्कराच्या दुसऱ्या तुकड्याही तैनात केल्या आहेत.

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Back to top button