MPSC : तयारी राज्यशास्त्र विषयाची
स्पर्धा परीक्षांतील चालू घडामोडींचे महत्त्व
एक अधिकारी म्हणूनच नव्हे, तर एक सुजाण नागरिक म्हणून आपणास आपण ज्या पद्धतीत जीवन जगतो त्या कोणत्या चौकटीत असणे बंधनकारक आहे. आपले हक्क ज्या पद्धतीने आपण मागतो त्याच पद्धतीने आपणास काही कर्तव्यदेखील पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी सुरळीतपणे चालविण्यासाठी आपल्या देशाने एक चौकट ठरविली आहे. त्यामध्ये विविध संस्थांचा, तत्त्वांचा, हक्कांचा व इतर बर्याच गोष्टींचा समावेश होतो. यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो. सदर लेखात आपण याच विषयाबाबतीत चर्चा करू.
विषयाचे परीक्षेतील महत्त्व –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात घेण्यात येणार्या बहुतांश सर्वच परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयास महत्त्व आहे. तथापि राज्यसेवा, PSI/S.T.I./Aso या दोन परीक्षांच्या अनुषंगाने विचार केल्यास पूर्व व मुख्य परीक्षा या दोन्ही टप्प्यांवर याला खूप महत्त्व प्राप्त होते. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील G.S. 2- सामान्य अध्ययन 2 हा संपूर्ण 150 प्रश्नांचा पेपर फक्त राज्यशास्त्र घटकावर अवलंबून आहे.
अभ्यासक्रम व तयारीची रणनीती –
यामध्ये भारताचे संविधान, राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार, कार्ये), केंद्र सरकार, संसद, न्यायमंडळ राज्य सरकार (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ), जिल्हा प्रशासन ग्रामीण व नागरी स्थानिक शासन, शिक्षण पद्धती, पक्ष आणि दबाव गट, प्रसार माध्यमे, निवडणूक प्रक्रिया प्रशासनिक कायदा, केंद्राचे व राज्याचे विशेषाधिकार, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986, ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, अनुसूचित 2000, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, अनुसूचित जाती, जनजाती अधिनियम 1989 नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, समजा कल्याण सामाजिक विधिविधान, सार्वजनिक सेवा, सरकारी खर्चावर नियंत्रण इ. ठळक गोष्टींचा समावेश होतो.
उमेदवारांनी सर्वप्रथम मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे प्रश्नांचे विश्लेषण करावे. तद्नंतर अभ्यासक्रम समजावून घ्यावा. या दोन गोष्टी व्यवस्थितरीत्या झाल्यानंतरच संदर्भसाहित्यांची निवड करावी. अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक मुद्दा क्रमशः वाचावा. त्यानंतर कलम 1 ते 51 यांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे उमेदवारांनी केंद्र व राज्य शासनाचा अभ्यास तुलनात्मकरीत्या करावा. उदा. पंतप्रधान अभ्यासल्यास लगेचच मुख्यमंत्री अभ्यासावे राष्ट्रपती – राज्यपाल, लोकसभा – विधानसभा, राज्यसभा, विधानपरिषद अशा प्रकारच्या अभ्यासामुळे परीक्षेवेळी होणार्या चूका पूर्णतः कमी होतात. अंतिम टप्प्यात उमेदवारांनी वेळा लावून जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करावा. अशा प्रकारे अभ्यास केल्यास जास्तीत जास्त गुण प्राप्त होतील.