योग्य पर्यायी विषय  कसा निवडायचा? | पुढारी

योग्य पर्यायी विषय  कसा निवडायचा?

ए. के. मिश्रा

नागरी सेवा परीक्षेत योग्य पर्यायी विषय निवडणे ही बाब नागरी सेवा इच्छुकांना त्यातल्या त्यात प्रथमच प्रयत्न करत असलेल्या नवशिक्यांसाठी बर्‍याच काळापासून त्रासदायक ठरत आहे. 2013 पासून दोन पेपरपैकी एक पर्यायी विषय बनविण्याच्या यूपीएससीच्या मुक्‍त निर्णयामुळे अशा इच्छुकांचा ताण कमी झाला आहे. कारण त्यांना आता फक्‍त एक पर्यायी विषय निवडण्याची गरज आहे, परंतु तरीही त्या पर्यायी विषयाची निवड केल्यानेही त्या विषयावर बराच फरक पडतो. प्रत्येकी 250 गुणांचे दोन पेपर असतात. यात योग्य वैकल्पिक विषय निवडणे फार महत्त्वाचे आहे कारण नागरी सेवा परीक्षेत निवड होण्याची शक्यता यामुळे नक्‍कीच वाढवेल, म्हणून एखाद्या इच्छुक उमेदवाराला पर्यायी विषय घेण्यापूर्वी उपलब्ध सर्व घटकांची माहिती असावी.

वैकल्पिक विषय निवडण्यापूर्वी उमेदवाराने विचारात घेतल्या जाणार्‍या या सर्व घटकांबद्दल जाणून घेऊ.

• एखादा विषय गुण देत असल्यास, विद्यार्थ्यांचा त्यास पर्यायी विषय म्हणून निवडण्याचा कल असतो.

• एखाद्या उमेदवाराला एखाद्या विषयावर चांगली जाण/पकड असल्यास तो नैसर्गिकरीत्या वैकल्पिक विषय म्हणून पहिली पसंती बनते.

एखाद्या उमेदवाराने आधीपासूनच शाळेत किंवा पदवी घेतलेल्या विषयात प्रावीण्य संपादन केले असेल तर ते जाणून घ्यायला सोपे होते आणि त्याने तो विषय स्कोअरिंग विषय म्हणून निवडणे स्वाभाविक आहे.

प्रथमच प्रयत्न करणारे बहुतेक विद्यार्थी एक पर्यायी विषय निवडतात ज्याला सर्वाधिक स्कोअरिंग विषय मानला जातो. म्हणून, बहुतेक विद्यार्थी भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, लोक प्रशासन किंवा मानसशास्त्र हे विषय निवडण्यास प्राधान्य देतात. आकडेवारीतून असे दिसून आले आहे की बहुतेक विद्यार्थी भौगोलिक विषय आणि लोक प्रशासन हे पर्यायी विषय म्हणून निवडतात. 80 टक्के हून अधिक इच्छुक याच विषयांची निवड करतात कारण हे सर्व विषय सामान्यत: सामान्य अभ्यास पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करताना अभ्यासासाठी घेतात. गेल्या काही वर्षांत उमेदवार लोक प्रशासनात 350 गुणांपेक्षा जास्त आणि भूगोलमध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवत आले आहेत; यावरूनच हे विद्यार्थी या विषयांची निवड का करतात, हे स्पष्ट होताना दिसते.

हे विषय सर्वात लोकप्रिय का आहेत याच्या कारणांबद्दल जाणून घेऊ.

सार्वजनिक प्रशासन म्हणजे प्रशासकीय वैशिष्ट्यांविषयी ज्ञान असणे आणि वैयक्‍तिक प्रशिक्षणापेक्षा आत्म-अभ्यास आणि स्वत: चा समजूतदारपणा यांचा यात समावेश आहे.•

इतिहास हा देखील बर्‍यापैकी लोकांना अभ्यासाठी शक्य आहे. कारण बर्‍याच विद्यार्थ्यांची विशेषत: कला शाखेतून आलेल्यांची इतिहासावर चांगली पकड असते.

बर्‍याच विद्यार्थ्यांना नकाशावर आधारित प्रश्‍नांमध्ये विशेष रस असतो. विशेषतः अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय पार्श्‍वभूमीतील विद्यार्थी आणि आयएएससाठीच्या इच्छुकांमध्ये भूगोल हा सर्वात लोकप्रिय असा विषय आहे.

तथापि, जेव्हा आपण कोणत्याही पेपरवर अधिक स्कोअरिंगबद्दल बोलतो, तेव्हा कोणताही पर्याय विषय हा कमी स्कोअरिंगचा नसतो.  तो मुख्यत्वे उमेदवारांच्या वैयक्‍तिक स्वारस्यावर आणि त्यांच्या शैक्षणिक पार्श्‍वभूमीवर अवलंबून असतो. जर एखादा उमेदवार एखाद्या विषयात अपवादात्मक चांगला असेल तर तो त्या पेपरमध्ये अधिक गुण मिळवेल. म्हणून जर भूगोल हा आपला आवडीचा विषय असेल, आणि तो आपल्याला शाळा, महाविद्यालयापासून अभ्यासाला असेल तर त्याने इतिहास विषय निवडणे शहाणपणाचे ठरत नाही कारण हा विषय परीक्षेत स्कोअरिंगचा होणार नाही.

सामान्यपणे भूगोल, इतिहास आणि समाजशास्त्र या विषयात विद्यार्थी चांगले गुण मिळवतात कारण त्यांनी या विषयांचा अभ्यास त्यांच्या शाळेपासून ते पदवीपर्यंत केलेला असतो. सार्वजनिक प्रशासन हे सध्या खूप लोकप्रिय आहे. कारण हे आत्म-अभ्यास आणि प्रशासकीय ज्ञानाबरोबरच भरपूर काही देते.  

बहुतेक विद्यार्थी हिंदी वाङ्मयाची निवड करतात; पण ते चुकीचेही नाही कारण हिंदी भाषिक राज्यांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी आयएएस परीक्षेला बसत असतात. त्यांच्यावर सहाजिकच त्या भाषेचा अधिक प्रभाव पडलेला दिसून येतो. 

अशाचप्रकारे पालीसारख्या भाषाही ठसा उमटवू लागलेल्या आहेत. आणि बहुतेक विद्यार्थी याही भाषेची निवड करीत आहेत, परंतु पुन्हा एकदा नमूद करावे वाटते की; ती निवड पूर्णपणे एखाद्याच्या आवडीची, शैक्षणिक आणि भौगोलिक पार्श्‍वभूमीची आणि  त्या व्यक्‍तीच्या ज्ञानावर अवलंबून असतेे. 

तामिळनाडू वगैरे भागातील अनेक उमेदवारांनी तामिळ साहित्य निवडलेले दिसून येते. परंतु अद्याप अशा भाषेस म्हणावी इतकी लोकप्रियता मिळालेली नाही कारण अजूनही बहुतेक उमेदवार इतिहास, भूगोल, लोक प्रशासन, समाजशास्त्र किंवा मानसशास्त्र या विषयांकडेच जाणे पसंत करतात.

Back to top button