रत्नागिरी : लांजातून जाणाऱ्या काजळी नदीच्या पात्रात दोघे भाऊ बुडाले | पुढारी

रत्नागिरी : लांजातून जाणाऱ्या काजळी नदीच्या पात्रात दोघे भाऊ बुडाले

लांजा; पुढारी वृत्तसेवा : लांजा तालुक्यातील आंजणारी काजळी नदीत मुळे शोधण्यासाठी गेलेल्या आंजणारी शिंदेवाडीतील दोन सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) सायंकाळी  घडली. प्रमोद नारायण शिंदे (25) आणि मनीष नारायण शिंदे (22) अशी या दुर्घटनेत बुडून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत.

या दुर्घटनेतून दोघा भावांची बहीण कल्याणी आणि मामा पांडुरंग शिंदे हे पाण्यातून वेळीच बाहेर आल्यामुळे बचावली. या दुर्घटनेमुळे आंजणारी गावावर शोककळा पसरली आहे. प्रमोद आणि मनिष यांच्या वडीलांचं काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. आता दोन भाऊ गेल्याने कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.

Back to top button