यवतमाळ : दोन चिमुकल्यासह महिलेचा नदीत बुडून मृत्यू
यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : निर्माल्य विसर्जित करण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यासह त्यांच्या काकूचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील कवठाबाजार येथे आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. तिघींचेही मृतदेह हाती लागले.
प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय ३५), अक्षरा निलेश चौधरी (वय ११), आराध्या निलेश चौधरी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. या तिघी घरातील पूजेतून आलेले निर्माल्य विसर्जित करण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात गेल्या. तिथे निर्माल्य विसर्जित करत असताना आराध्याचा ताेल गेला. तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण अक्षरा व काकू प्रतीक्षा पुढे सरसावल्या, मात्र त्यांचाही घात झाला. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. नदीपात्रात रेती उत्खनन केल्यामुळे माेठ-माेठे खड्डे पडले आहेत. यातच तिघीही बुडाल्या. ही बाब नदी तीरावर असलेल्या इतरांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली. ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ताेपर्यंत तिघीही पाण्यात बुडाल्या हाेत्या. अखेर तिघींचेही मृतदेहच हाती लागले. या घटनेने गावात शाेककळा पसरली आहे.