Rama Raghav Serial : लावण्याने आणली राघववर संक्रांत...
पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जोडी ‘रमा राघव’ आता अनंत अडचणींवर मात करत, प्रेमाच्या रंगात रंगत संसारात रुळत चालली आहे, मात्र, लग्नाला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळवण्याची त्यांची धडपड अजूनही सुरू आहे. राघवच्या वडिलांचा कडवा विरोध ते रमाच्या आईचे तिला परत घरी आणण्याचे प्रयत्न या कात्रीत अडकलेल्या या जोडीला मोठा धक्का द्यायचे रमाची आई ठरवते. ( Rama Raghav Serial )
संबंधित बातम्या
- Sai Tamhankar : सुर्य अस्ताला जातानाही विचारत पडला की थांबू का?; सईचे ऑरेंज शॉर्टमध्ये गच्चीत फोटोशूट
- Sidharth Malhotra Birthday : ‘हॅपी बर्थडे माय लव्ह…’ म्हणत कियाराचं सिद्धार्थसोबत लिपलॉक (video)
- Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरचा भाव वधारला
लावण्या मकरसंक्रातीला राघववर संक्रांत आणते, मात्र, ‘उत्तरायणाच्या दिवशी हे ग्रहण भेदून राघव नावाचा सूर्य कसा तळपतो ते तू आता बघच’ असा प्रेम आणि नात्यावरचा दृढविश्वास रमा व्यक्त करते. रमाचा हा विश्वास राघव कसा सिद्ध करतो आणि ‘रमा राघव’च्या आयुष्यात ‘शुभ संक्रमण’ येते का? राघववर आलेली संक्रांत टळेल? याची उत्कंठावर्धक गोष्ट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ( Rama Raghav Serial )