मुख्यमंत्री- राज ठाकरे यांची भेट, यावरून टोलचा झोल किती मोठा? हे कळते : विजय वडेट्टीवार | पुढारी

मुख्यमंत्री- राज ठाकरे यांची भेट, यावरून टोलचा झोल किती मोठा? हे कळते : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री शिंदे यांनी टोल माफीची घोषणा केली होती. ही टोलमाफी एका जिल्ह्यापुरतीच न करता सर्व जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करावी, ही मागणी जनतेची आहे. मात्र, आज सत्ता केंद्र बदलत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावरून टोलचा झोल किती मोठा? हे कळते, असे टीकास्त्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोडले.

.मागासवर्गीय जाहिराती संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जाहिराती निडणुकीच्या तोंडावर का दिल्या? ३१ कोटी रुपये का खर्च होतायत? विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. भाजप ओबीसी जागर यात्रा संदर्भात बोलताना आशिष देशमुख कधी ओबीसी झाले? त्यांना कोणतीही जबाबदारी नसल्याने ही यात्रा आहे. तसेच  ३० दिवस होत आहेत. अजून ओबीसी आणि सरकार बैठकीचे मिनिटस आले नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कंत्राटीकरणं बाबतीत छेडले असता राज्यात १ लाख पदे भरण्याचं काम सुरू झाले आहे. ५ वर्षाची कंत्राट नौकरी असेल तर वयाच्या ३५ व्या वर्षानंतर हे तरुण काय करतील? पोलीस सुरक्षा खाजगीकरण का करताय? राज्याची सुरक्षा व्यवस्था हे उध्वस्त करत आहेत. आमचे सरकार आले, तर मी तरुणांना आश्वस्त करतो की, मी त्यांना शासकीय नोकरीत घेईन. असेही ते म्हणाले.

तसेच वाघ नखं आणण्यासाठी गेलेले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नागपुरात स्वागत झाले. याबाबत बोलताना, अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला नाही. महाराजांचे गडकिल्ले कशा अवस्थेत आहेत, त्यांच्याकडे लक्ष नाही, तसेच स्मारकाबाबत काही केले जात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवारांबद्दल बोलताना ते म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. महाविकास आघाडीचा, काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेस राहील. काँग्रेस एकमेव पक्ष आहे, ज्यामध्ये तडा गेला नाही. काँग्रेस मोठा भाऊ आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून येतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button