मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी व अंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी व अंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी व निवळी-बावनदी पूल सायंकाळी साडेचार वाजाल्यानंतर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

गेले दोन दिवस मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे काजळी नदी व बावनदी धोका पातळीवरुन वाहत आहे. पुलावरुन पाणी जाऊ लागल्यामुळे आता दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button