धक्कादायक! कोरोना काळात भारतात जगात सर्वाधिक २.६६ कोटी बालविवाह
कोरोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी होऊन आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्या. दक्षिण आशियातही घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्ने कमी वयात झाल्याचे युनिसेफने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारतात या काळात 2.66 कोटी मुलींचे बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती यातून उघड झाली आहे. दक्षिण आशियातील बालविवाह केलेल्या मुलींची संख्या 29 कोटी असून ही संख्या जगातील बालविवाहांच्या संख्येच्या 45 टक्केआहे.
या देशांत सर्वाधिक बालविवाह
भारत
बालविवाहाची संख्या : 2,66,10,000
18 व्या वर्षी लग्न करणार्या मुलींचे प्रमाण : 47 टक्के
लग्नाचे कायदेशीर वय : मुलगा – 21 / मुलगी – 18
ब्राझील
बालविवाहाची संख्या : 29,28,000
18 व्या वर्षी लग्न करणार्या मुलींचे प्रमाण : 36 टक्के
बालविवाहाची संख्या : 39,31,000
नायजेरिया
बालविवाहाची संख्या : 33,06,000
18 व्या वर्षी लग्न करणार्या मुलींचे प्रमाण : 43 टक्के
लग्नाचे कायदेशीर वय : मुलगा – 18 / मुलगी – 18
बांगला देश
बालविवाहाची संख्या : 39,31,000
18 व्या वर्षी लग्न करणार्या मुलींचे प्रमाण : 52 टक्के
लग्नाचे कायदेशीर वय : मुलगा – 21 / मुलगी – 18
इथिओपिया
बालविवाहाची संख्या : 19,74,000
18 व्या वर्षी लग्न करणार्या मुलींचे प्रमाण : 41 टक्के
लग्नाचे कायदेशीर वय : मुलगा – 18 / मुलगी – 18
- इथिओपियात चुलत भाऊ आपल्या बहिणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिच्याशी लग्न करू शकतो, अशी प्रथा आहे. त्यामुळे पाचपैकी एका तरी मुलीचे 18 वयाच्या आतच लग्न केले जाते.