छत्रपती संभाजीनगर: अजिंठा परिसरात गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान
अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अनाड, मुखपाट, पिंपळदरी, बाळापूर आदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तर शिवणा, अमसरी, गोळेगाव धोत्रा आदीसह काही ठिकाणी अवकाळी पाऊस जोरदार झाला. यामुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
अनेक शेतकर्यांनी शेतामधील पिके शेतातच ठेवली होती. तर हरभरा, मका, गहू, सुर्यफुल, यांची सोंगणी बाकी होती. मात्र, जोरदार वार्यासह पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. गारपीट झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
हेही वाचा