मित्रांमुळे होतो मानसिक तणाव कमी | पुढारी

मित्रांमुळे होतो मानसिक तणाव कमी

न्यूयॉर्क :

मित्रांमुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते, असा निष्कर्ष नुकत्याच करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात काढण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्यासोबत असणार्‍या मित्रांच्या मानसिक समस्यांबाबत संवेदनशील असतात.

यामुळे मित्राला आलेला मानसिक ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. महाविद्यालयात शिकताना एखाद्या विद्यार्थ्याला जर मानसिक ताण आला असेल, तर त्याला त्यातून वेळीच बाहेर काढण्यासाठी सोबतच्या मित्रांची फार मदत होते, असे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे पॅट्रिक रोआऊट यांनी म्हटले आहे.

Back to top button