औरंगाबाद : अंजना नदीवरील पूल पहिल्याच पुरात गेला वाहून

औरंगाबाद : अंजना नदीवरील पूल पहिल्याच पुरात गेला वाहून
Published on
Updated on

नाचनवेल; पुढारी वृत्तसेवा :  कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक व जवखेडा खुर्द येथील अंजना नदीच्या रस्त्यावरील पुल पहिल्याच पुरात वाहून गेला.  औरंगाबादला जोडणारा सर्वात जवळचा हा मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांना शहरात जाण्यासाठी नाचनवेल व कन्नड मार्गाने जास्त अंतर पार करून जावे लागत आहे. नदी पार करून शाळेत जावे लागत असल्याने पूलाअभावी शालेय विद्यार्थ्यांचेही  नुकसान होत आहे.

अनेक दिवसांपासून या पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. तसेच पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने वाहनचालकांना तारेवरती कसरत करावी लागत होती. हा पूल पुराच्या पाण्यात होऊन गेल्याने जवखेडा बुद्रुक व जवखेडा खुर्द या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

गेल्या वर्षीही पुराच्या पाण्यात हा पूल वाहून गेला होता; पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या पुलाची तात्पुरत्या स्वरूपात
डागडुगी करून पर्यायी रस्ता सुरू करण्यात आला होता.  नदी पार करूनच शाळेत जावे लागत असल्याने पूलाअभावी जवखेडा खुर्द व जवखेडा बुद्रुक येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने या पुलांची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिलेला आहे.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news