पुढारी ऑनलाईन डेस्क : औरंगाबादची प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्याचे आई-वडीलांशी भांडण झाल्याने ती घरातून बेपत्ता झाली होती. त्यामूळे एकच खळबळ उडाली होती. व्हिडीओमुळे प्रसिद्धी मिळालेली काव्या अचानक गायब झाली. यानंतर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले होते.
काव्या शुक्रवारी अचानक घरामधून बेपत्ता झाली होती. यांनतर तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेणे सुरू केले परंतु काव्याने आपला मोबाईल घरीच ठेवला होता. यामुळे तीचा शोध घेणे हे पोलिसांना आव्हानात्मक होते.
असा घेतला काव्याचा शोध…
घरामध्ये भांडण झालेनंतर रागाच्या भरात काव्या घर सोडून गेली. जाताना तिने आपला मोबाईल घरामध्येच ठेवला होता. यामूळे तिचे लोकेशन सापडणे कठीण होते. पालकांनी दिलेली माहितीनुसार, पोलिसांच्या सायबर सेलने मागोवा घेतला. या तपासामध्ये काव्या रेल्वेने मध्य प्रदेशला जात असल्याचे समोर आले. परंतु पोलिसासमोर आणखी एक मोठे आव्हान होते की महाराष्ट्रातून रोज शेकडो रेल्वे मध्य प्रदेशाला जातात. यामूळे नेमक्या कोणत्या रेल्वेत काव्या गेली आहे हे शोधणे कठीण होते. दरम्यान, पोलिसांनी काव्याची माहिती RPF च्या टिमला दिली.
RPF टीमने तपास सुरू केला. या तपासामध्ये काव्या खुशीनगर एक्स्प्रेसने जात असल्याची माहिती मिळाली. तसेच ती ज्या रेल्वेने प्रवास करत होती ती रेल्वे मध्य प्रदेशातील खांडवा शहर ओलांडून पुढे हाेती. या माहितीच्या आधारे RPF च्या टिमने काव्याला पुढील रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.
बेपत्ता होण्याचे हे आहे कारण
अभ्यासाच्या मुद्यावर काव्याचा आई-वडिलांशी वाद झाला होता. यानंतर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. औरंगाबादच्या पोलीसांनी तात्काळ सर्व सुत्रे हाती घेत काव्याचा तपास केला. त्यामुळे 24 तासांच्या आत तिचा शोध लागला.
हेही वाचा