‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘त्या’ सीनची चर्चा | पुढारी

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील 'त्या' सीनची चर्चा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा विषय, दर्जेदार लिखाण, उत्तम दिग्दर्शन आणि या सर्वाला न्याय देणारा कलाकारांचा कसदार अभिनय यामुळेच या मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.

सध्या मालिकेत यश आणि गौरीच्या साखरपुड्याचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. मात्र, साखरपुड्याच्या दिवशी गौरीने आपण आई होऊ शकत नाही हे सत्य सर्वांना सांगितलं आणि आईपणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

अधिक वाचा 

आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का? या विषयावर भाष्य करणारा हा प्रसंग मालिकेत सलग तीन दिवस चालला आहे. ३१ पानांची संहिता असलेला हा प्रसंग कलाकारांनी जीव ओतून सादर केला. त्यामुळेच या खास भागाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

एकाच विषयावर तीन भाग चर्चा चालू ठेवणं हे इतिहासात…

‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या या खास भागाविषयी सांगताना अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर म्हणाल्या की,‘एकाच विषयावर तीन भाग फक्त चर्चा चालू ठेवणं हे टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असावं.

अधिक वाचा 

तरीही प्रेक्षकांनी हे तिन्ही भाग समरसून पाहिले हे खूप विशेष आहे. आई या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी घेऊन केलेल्या मालिकेमध्ये आई होणं या विषयावर गेले ३ एपिसोड सर्व बाजूंनी चर्चा चालू आहे. हा संपूर्ण सीन ४१ मिनिटांचा होता. या ३ एपिसोडला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

 

 

अधिक वाचा 

याचं संपूर्ण श्रेय आमची लेखिका मधुराणी गोडबोले, पटकथा लेखिका नमिता वर्तक, दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि संपूर्ण आई कुठे काय करतेच्या टीमचं आहे. आजवर मालिकेला मिळालेलं प्रेम अभूतपूर्व आहे हे प्रेम असंच वाढत राहो हीच अपेक्षा.’

यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button