'मन झालं बाजिंद' मालिकेत दिसणार अनोखी प्रेमकथा
मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन यांची ‘मन झालं बाजिंद’ ही मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे. या माालिकेत वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघेही पहिलादा एकत्रित पाहायला मिळणार आहे.
आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु, पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या (वैभव आणि श्वेता) प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा
- राज कुंद्रा प्रकरणात चर्चेत असलेली कामसूत्र फेम शर्लिन चोप्रा कशी आली पॉर्न इंडस्ट्रीत?
- ‘राज कुंद्रा घरात घुसून Kiss करू लागला, मी धक्का देऊन बाथरुममध्ये पळाले’
परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.
मामा-मामीच्या घरी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा (श्वेता) आपली मुख्य नायिका आहे. दोघांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे.
अधिक वाचा
- संजय दत्त @62 years : नायक नहीं खलनायक हूँ मैं….
- ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो केले शेअर
‘मन झालं बाजिंद’ मालिकेत अनोखी प्रेमकथा
पिवळा रंग हा बुद्धीचं प्रतीक, मांगल्याचा- समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वास निर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे.
अधिक वाचा
- कसबा बावडा-शिये रस्त्यावरून वाहनधारकांची ये-जा सुरू
- नारायण राणे यांच्या मुलांसारखी मुलं कुणाच्या पोटी असू नयेत : भास्कर जाधव
या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे. ही मालिका झी मराठीवर येत आहे.
हेही वाचलंत का?