मोदी म्हणाले, अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याने जगाला खूप काही शिकविले
पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याने जगाला खूप काही शिकविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या हल्ल्याच्या विसाव्या स्मृतीदिनी केले. गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम भवनचे उद् घाटन मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बालिका छात्रावासचेही भूमिपूजन केले.
- रेकॉर्डब्रेक पाऊस : दिल्लीत रस्ते, सखलभागांसह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी
- Pune Crime : आई झाली दुर्गा! पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका
- Annaatthe rajnikant : रजनीकांत, जयकांत शिक्रे पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर
अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, त्या हल्ल्याने जगाला खूप काही शिकविले आहे. हा मानवतेवरील हल्ल्याचा दिवस आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. अशावेळी सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास…हा मंत्र लक्षात ठेवून काम करण्याची गरज आहे.
- अभिनेत्री केतकी चितळेवर अटकेची टांगती तलवार
- पुणे : ढाेंगी मनोहर भोसले याला पाच दिवसांची पोलिस कोठडी
- राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…
कोणतेही काम करण्याआधी गणेशपूजा करण्याची आपली परंपरा आहे आणि सौभाग्याने सरदारधाम भवनचे उद्घाटन गणेशोत्सवातच होत आहे.
१८९३ साली आजच्याच दिवशी शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी ऐतिहासिक भाषण दिले होते, असे मोदी यांनी सांगितले.
तामिळी कवी सुब्रमण्यम भारती यांचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, सुब्रमण्यम भारती यांनी आपले पूर्ण जीवन समाज आणि देशाच्या कल्याणासाठी घालविले.
देशाची तसेच मानवाची एकता यावर त्यांचा भर होता. त्यांचा हा आदर्श भारताच्या विचार आणि दर्शनाचा अविभाज्य भाग आहे.
बनारस हिंदू विश्वविद्यालयात सुब्रमण्य भारती यांच्या नावाने केंद्र उघडले जाईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेही उपस्थित होते.
हेही वाचलं का ?
- कुरुंदवाड नगरीत धार्मिक एकतेची वीण घट्ट; ५ मशिदींमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना
- अमेरिकेने दहशतवादी समजून निर्दोष व्यक्तीला ठार मारले
- केंद्राने नवीन प्रोत्साहन योजनेत विकेंद्रित वस्त्रोद्योग घटकांना वाऱ्यावर सोडले
- कर्नाटकची एक इंच भूमी, एक थेंब पाणी सुद्धा कोणाला देणार नाही : गोविंद कारजोळ
- सपना चौधरीचा कार अपघातात मृत्यू झाल्याची अफवा, नेटकर्यांनी वाहिली श्रध्दांजली (video)
पहा व्हिडिओ : गणपतीच्या ३०० पेक्षाही जास्त दुर्मिळ मूर्तींचा संग्रह