नारदा घोटाळा : ममतांच्या मंत्रीमंडळातील दोन मंत्री सीबीआयकडून ताब्यात | पुढारी

नारदा घोटाळा : ममतांच्या मंत्रीमंडळातील दोन मंत्री सीबीआयकडून ताब्यात

कोलकाता ः पुढारी ऑनलाईन

पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळातील फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी यांना नारदा घोटाळ्यात सीबीआयने अटक केली आहे. त्यांनी सीबीआयच्या ऑफिसमध्ये नेण्यापूर्वीच स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय ऑफिसमध्ये पोहोचल्या आहेत. आज सकाळीच या प्रकरणात तृणमूल काॅंग्रेसचे दोन मंत्री, एक आमदार आणि माजी मंत्री शोभन चटर्जी यांना सीबीआयच्या कार्यालयात नेण्यात आले होते. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सीबीआयच्या टीमने सोमवारी हाकिमा यांनी त्यांच्या चेतला निवासावरून सीबीआय कार्यालयात नेण्यात आले आहे. 

वाचा ः Cyclone Tauktae : संध्याकाळपर्यंत ‘ताउक्ते’ चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार!

यापूर्वी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी सीबीआयला फिरहाद हाकिम यांच्यासहीत सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्या विरोधातील कारवाईला मंजूरी दिली होती. त्यावेळी हाकिम म्हणाले होते की, “आमचा विश्वास आहे की आम्हाला क्लीन चीट मिळेल. मी न्यायालयावर विश्वास ठेवतो. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी तिथे माझी बाजू मांडेन आणि मला न्याय नक्की मिळेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाचा ः देशात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

२०१४ साली नारदा घोटाळा समोर आलेला होता. तेव्हा पत्रकार मॅथ्यू सॅम्युल यांनी कोलकात्यात स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर हा घोटाळा माध्यमांसमोर आला. या व्हिडीओमध्ये तृणमूल काॅंग्रेसचे अनेक नेते रक्कम घेताना दिसून आले होते. याशिवाय एक पोलिस अधिकारीदेखील रक्कम घेताना दिसून आला होता. सीबीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममतांच्या सरकारमधील ४ मंत्र्याविरोधात लाचलुचपत कायद्यातील कलमं लावून चार्जशीट दाखल करण्याची मागणी केलेली होती. अंतिमतः जगदीप धनखड यांनी त्याला मंजूरी दिली होती. 

Back to top button