मराठा समाजातील तरुणांसाठी 'सारथी' संस्थेमार्फत नवे उपक्रम राबवा : प्रतीक पाटील
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील सध्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या महापूरावेळीही ते सक्रिय होते. त्यांनी अनेक पूरग्रस्त गावांना भेटी देवून मदत केली आहे. आज प्रतीक पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजातील तरुणांसाठी ‘सारथी’ संस्थेमार्फत नवे उपक्रम राबविण्यात यावेत, या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
- पुरुष हॉकी : कांस्य पदकासाठी भारत जर्मनीला भिडणार!
- कामिला ग्यॉर्गी मारिया शारापोवापेक्षाही हॉट टेनिसपटू
सांगली जिल्ह्यातील राजकारणात प्रतीक पाटील सक्रिय
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील सद्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. प्रतीक पाटील यांनी जिल्ह्यातील तरुणांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. इस्लामपूर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांच्याही भेटी घेत आहेत.
- कोकण विभागाचा सर्वाधिक 99.81 टक्के निकाल
- ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सरकारमधील हस्तक्षेप वाढला’
निवेदनात मागण्या काय आहेत
1. सारथीतर्फे मराठा समाजातील युवक- युवतींना IIT आणि IIM या जागतिक दर्जाच्या भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष प्रशिक्षणाचे कोर्सेस आयोजित करावेत. त्यासाठी शालेय पातळीपासूनच प्रबोधन करता येईल.
2. दहावी-बारावीच्या गुणांवर पुढील प्रवेश अवलंबून असल्याने दहावी-बारावीतील गुण अधिक असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मराठा समाजातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करावेत.
3. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषांचे वर्ग सुरू करावेत.
4. इतर व्यावसायिक कौशल्ये जसे की सुतारकाम, प्लंबर, इत्यादीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत.
- अजिंक्य रहाणे म्हणाला, फलंदाजीसाठी इंग्लंडमधील परिस्थिती आव्हानात्मक
- जळगाव जिल्ह्यात अनलॉकचे नोटिफिकेशन जारी : अभिजीत राऊत
5. जागतिक दर्जाच्या विद्यापीठात शिकण्यासाठी मराठा समाजाच्या 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देणे.
6. मराठा समाजातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना विशेष प्रोत्साहनपर भत्ता सुरू करणे.
7. मराठा समाजातील उद्योगपतीचा एक सेतू उभारून व्यवसायाभिमुक कौशल्ये विकसित होण्यासाठी केंद्र सुरू करणे.
8. मराठा समाजातील मुला- मुलींसाठी पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे हॉस्टेल्स उभारणे.
9. मराठा समाजातील भूमिहीन आणि अल्पभूधारक व्यक्तींच्या पाल्यांचा डाटा जमा करून ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर फेकले जात नाहीयेत, याचे ट्रॅकिंग करणे, शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्या मुला- मुलींना प्रवाहात आणणे.
10. जीवनाच्या विविध क्षेत्रात जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या व्यक्तींचे सारथीसाठी सल्लागार मंडळ स्थापन करून वेळोवेळी नवीन धोरणे ठरवून अंमलात आणणे.
निवेदनात या मागण्या करण्यात आल्या आहेत.
‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारीं यांचा सरकारमधील हस्तक्षेप वाढला’ https://t.co/yAlGvDRo8vराज्यपाल-भगतसिंग-कोश्यारी-यांचा-सरकारमधील-हस्तक्षेप-वाढला/ar #pudharionline #pudharinews @BJP4India
— Pudhari (@pudharionline) August 3, 2021
हे ही वाचलत का :
- मनी हाएस्ट ५ : शेवट कसा होणार? ट्रेलरमधून तर्क-वितर्कांना उधाण
- संसदेत गदारोळ बनला नित्याचाच कार्यक्रम; उभय सदनांचे कामकाज पुन्हा वाया
- अन् अमृता खानविलकर बनली चॉकलेट गर्ल