पिंपरी : किरकोळ वादातून महिलेस मारहाण | पुढारी

पिंपरी : किरकोळ वादातून महिलेस मारहाण

पिंपरी : शेतात पाणी सोडण्याच्या किरकोळ वादातून तिघांनी मिळून एका महिलेला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी तीनच्या सुमारास शेलपिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रसाद दीपक गायकवाड आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रसाद याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी महिलेला शेतात पाणी सोडण्यास मनाई केली. याचा राग आल्याने आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करीत दगडाने मारहाण केली. चाकण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button