जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याचे निर्देश नोटिफिकेशनच्या माध्यमातून जारी केले आहेत. अनलॉकचे नोटिफिकेशन जारी केल्याने व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने काल निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले होते. यानंतर सायंकाळी एका 'जीआर'च्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. यानंतर आज मंगळवारी (दि.३) रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्ह्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यात खालील प्रमाणे नवीन नियम असणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आलेले असून, चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाईजरचा वापर , सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि शासनाने दिलेल्या निर्गमित केलेले नियमांचे पालन करण्याचे गरजेचे आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रूपये दंड आकारण्यात यावी, अशी सूचना पोलीस विभाग आणि महापालिका यांना देण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?