लोकल वाहतूक कोलमडली, विक्रोळी- कांजूरमार्गावर भरले पाणी
मुंबई; पुढारी वृत्तसेवा: पावसाने आपला जोर कायम असल्याने मध्य रेल्वेची सिएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकल वाहतूक सोमवारी (दि.१९) कोलमडली. यामुळे मध्य रेल्वेने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.
अधिक वाचा
- रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस
- महाड पोलादपूर परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी, सावित्री नदी दुथडी भरून वाहू लागली
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी पहाटेपासून उशिराने का पण सुरु होती. परंतु, सोमवारी सकाळी ९ नंतर पावसाचा जोर वाढला. कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान पाणी भरल्याने लाेकल वाहतूक विस्कळीत झाली.
अधिक वाचा
- हरिनामाच्या गजरात माऊलींच्या चलपादुका पंढरपूरकडे मार्गस्थ
- औरंगाबाद : लष्करी जवानाची छावणीत आत्महत्या, मैदानातील झाडाला घेतला गळफास
अप आणि डाउन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. परिमाणी, सीएसएमटी ते ठाणे लोकल सेवा बंद करण्यात आली. ठाणे- कल्याण, कर्जत, कसारा, सीएसएमटी- पनवेल, नेरुळ- खारकोपर तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरु आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.
२४ तासात पाणीसाठा १ लाख २८ हजार दशलक्ष लिटरने वाढला
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व भातसा या प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे.
गेल्या २४ तासात पाणीसाठयात १ लाख २८ हजार ९३ दशलक्ष लीटर इतकी वाढ झाली आहे. १८ जुलैला तलावातील पाणीसाठा २ लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लीटर इतका होता. १९ जुलैला हा पाणीसाठा ४ लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटरवर पोहचला. शहराला दररोज सर्वाधिक १ हजार ८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठाही वाढत आहे.
हेही वाचलंत का?
- साउथ सुपरस्टार सिद्धार्थ युट्यूबवर मृत घोषीत अन्…
- सातारा : रोजलॅन्ड स्कूलमधील तिघा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा
- संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची रणनिती
- चिनी कम्युनिस्ट पक्ष : ‘शंभरी’चे सिंहावलोकन
- निकालाचीच ‘परीक्षा’
पाहा : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!