वैद्यनाथ कारखाना : कार्यकारी संचालकांचा मोठा खुलासा
बीड, पुढारी वृत्तसेवा : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना चे कोणतेही बँक खाते जप्त झालेले नाही. यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी दिले आहे.
हे ही वाचा :
- कोरोना : देशात ऑगस्ट अखेरपर्यंत तिसरी लाट
- वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या
वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते सिल झाले असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे.
- डोंबिवली स्टेशन समोरील धोकादायक लक्ष्मी निवास इमारतीला आग
- चंद्रपूर : खर्रा आणायला गेलेल्या महिलेवर अत्याचार आरोपीला अटक
अशा कठीण परिस्थितीत खोडसाळ आणि शेतकर्यांची दिशाभूल करणार्या बातम्या प्रकाशीत करणे चुकीचे आहे. चुकीच्या बातम्या देणं आणि शेतकर्यांचे भवितव्य धोक्यात आणणे हा राजकीय खोडसाळपणा आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही, असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.
- सरकारी नोकरी : संरक्षण विभागात 458 पदांसाठी भरती
- पुणे महापालिका : २३ गावांचा आराखडा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा
वैद्यनाथ कारखाना संदर्भात काय होती बातमी
पीएफची रक्कम थकल्यामुळे ईपीएफओच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. पीएफचे एक कोटी ४६ लाख रुपये थकलेले होते. ईपीएफओच्या वतीने ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. शिल्लक थकबाकी घ्या वसुलीसाठी कारखान्याचे खाते सील (होल्ड) करण्यात आले. थकबाकी वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे.