

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ओढ्याहून धुणे धुवून घरी परतत असताना अंगावरती उच्च विद्युत वाहिनी ची तार खांबावरून तुटून पडल्याने शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू झाला.
दरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या १२ वर्षाची चुमुकली बालंबाल बचावली.
ही घटना बाचणी तालुका कागल येथे मंगळवार दिनांक २० रोजी सकाळी ११ वाजता घडली.
गीता गौतम जाधव (वय ३२) व हर्षवर्धन गौतम जाधव (१४) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय लेकरांची नावे आहेत.
दरम्यान, यामध्ये भक्ती गौतम जाधव ही बारा वर्षाची चिमुरडी बालंबाल बचावली.
तिच्यामुळेच या घटनेची माहिती घरात समजली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महावितरणकडून संबंधित कुटुंबाला अंत्यविधीसाठी तातडीची ४० हजार रुपयांची मदत दिली आहे.