धुक्यामुळे दिल्ली, मुंबईहून आलेल्या विमानांच्या आकाशातच घिरट्या

धुक्यामुळे दिल्ली, मुंबईहून आलेल्या विमानांच्या आकाशातच घिरट्या
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून थंडी बरोबरच धुक्याचेही प्रमाण वाढले आहे. धुक्यामुळे शुक्रवारी (दि.६) दिल्ली व मुंबईहून औरंगाबादला आलेले विमान विमानतळावर न उतरता आकाशातच घिरट्या घालून मुंबईला माघारी परतले.

सकाळी ८ च्या सुमारास एअर इंडियाचे दिल्ली-औरंगाबाद व मुंबई-औरंगाबाद असे दोन विमाने सेवा देतात. शुक्रवारी दोन्ही विमाने नियमित वेळेत औरंगाबाद विमानतळावर दाखल झाली होती. परंतु त्यांना धुक्यामुळे उतरण्यास अडचणी निर्णाण होत असल्याने दोन्ही विमानांनी आकाशात सुमारे १५ मिनिटे घिरट्या घातल्या. तरीही धावपट्टी दिसत नसल्याने दोन्ही विमाने मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान सकाळीच दिल्ली आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच ताटकळावे लागले तर काही प्रवाशी मात्र इतर मार्गाने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, इंडीगोची मुंबई-औरंगाबाद आणि औरंगाबाद-हैदराबाद दोन्ही विमाने नियमित वेळेत आली आणि उड्डाण ही केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news