औरंगाबाद : नाथसागर धरणात आंघोळ करताना भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू
पैठण ; पुढारी वृत्तसेवा पैठण येथील नाथसागर धरणामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एका भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या भाविकांचे नाव रामचंद्र तुकाराम जायभाय (वय ५५) रा. करजखेडा ता. लोणार जिल्हा बुलढाणा असे आहे.
आज (रविवार) सकाळी देवदर्शनासाठी पैठण येथे आलेल्या भाविक रामचंद्र तुकाराम जायभाय हे सकाळी दहा वाजता नाथसागर धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले. यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना धरणावर मासेमारी करणाऱ्या काही तरुणाच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पैठण पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय मदने, पोना श्रीराम चेडे, प्रमोद मसलकर, अंकुश शिंदे यांना घटनास्थळी पाठवून या भाविकांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पैठण येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पैठण पोलिसांनी या भाविकाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे.
हेही वाचा :