पुढारी ऑनलाईन डेस्क : अनुष्का शर्मा-विराट कोहली लव्हली कपल्सपैकी एक आहेत. आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे. या दोघांची लव्हस्टोरी तर सर्वश्रुत आहेच. पण या दोघांच्या स्टोरीमध्ये आणखी एकाचा हात आई हे तो म्हणजे सलमान खान. (HBD Virat ) अभिनेता सलमान खानने विराट आणि अनुष्का यांच्यातील मतभेद दूर करून दोघांना एकत्र आणले आणि विराटचं तुटलेलं हार्ट सलमानने जोडले होते. (HBD Virat)
विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची भेट २०१३ मध्ये एका जाहिरात शूटींगच्यावेळी झाली होती. त्यावेळी विराट क्रिकेटमध्ये आणि अनुष्का बॉलीवूडमध्ये यशाच्या शिखरावर होते.
या भेटीवर विराटने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'पहिल्यांदा जेव्हा तो अनुष्काला भेटला होता तेव्हा तो खूप नर्वस होता. त्याने सांगितलं होतं की, तो घाबरला होता. मग, भीती घालवण्यासाठी त्याने अनुष्कासमोर विनोद केला. खरंतर अनुष्काने पहिल्या भेटीत खूप हाय हिल्स घातल्या होत्या. कोहलीने म्हटलं होतं की- तुला वाटत नाही की, तू खूप उंच हिल्स घातल्या आहेस'.
खरंतर, विराट कोहली-अनुष्का शर्मा नेहमी आपल्या नात्यांविषयी टाळत राहिले. अनुष्का शर्माची क्रिकेटमधील आवड आणि एकमेकांसोबत एकत्र असणं, यावर शिक्का बसला की, दोघांच्यामध्ये प्रेमाची कळी फुलतेय. स्वत: विराट कोहलीने एका मॅचमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या अनुष्का शर्माला बॅटने फ्लाईंग किस दिलं होतं. यानंतर दोघांच्या नात्याची खूप चर्चा झाली. सोशल मीडियावर विरूष्काच्या नावाची खूप चर्चा होऊ लागली.
सन २०१६ मध्ये दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. याचवर्षी विराट कोहलीने सोशल मीडियावर Heartbroken लिहिलं होतं. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केलं होतं. यानंतर विराट-अनुष्काचा ब्रेकअप झाला होता. आधी प्रेम नंतर ब्रेकअप आणि मग लग्न. विरुष्काचं प्रेम जुळवून आणण्यसाठी सलमान भाईचा मोठा हात होता.
दरम्यान, ब्रेकअपच्या वृत्तांमध्ये अनुष्काची सलमानने सुलतान चित्रपटासाठी निवड केली. मात्र यावेळी अनुष्काने प्रेमात काही नियम घालून दिले. शेवटी प्रेमात सगळं काही चालतं? सलमाननेही दोघांचा पॅचअप घडवून आणला.
या सर्व गोष्टी सुरु असतानाचं क्रिकेटर युवराज सिंह आणि हेजल कीच यांच्या लग्नात विराट-अनुष्का दिसले. त्यांच्या लग्नात दोघांनी डान्सदेखील केला. २०१७ च्या डिसेंबर महिन्यात दोघांनी इटलीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.