मंदिरे दिवाळीपर्यंत बंदच! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
जालना; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे बंदच राहतील. कोरोनाचे आकडे कमी झाले तर दसरा, दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी म्हटले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आयसीआयसीआय बँकेमार्फत सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी दिलेल्या अत्याधुनिक अशा दोन फिरत्या रुग्णालयांचे लोकार्पण आरोग्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आले. नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. पण, थिएटर, धार्मिक स्थळे याबाबत निर्णय झाला नाही. सध्या सणांचे दिवस आहेत. दसरा, दिवाळी तोंडावर असून कोरोनाबाधितांचे प्रमाण घटल्यास मंदिरे उघडण्याबाबत निर्णय शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
- श्रीनगर : दहशतवाद्यांचा गोळीबार उपनिरीक्षक शहीद; व्हिडिओ व्हायरल
- सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
हा निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून घेतला जाईल. आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत अधिकार आहेत, अशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री यांनी दिली.
- कोरोना मृत्यू संबंधी अधिकृत कागदपत्रांसाठी दिशानिर्देश : केंद्र सरकार
- गणेशोत्सव विशेष : जोडी तुझी माझी
मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेली बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आवश्यक आहे.
- कास पठारावर रानगव्यांचा मुक्त संचार
- DSP HeeraLal Saini Viral Video : राजस्थानच्या डीएसपीचा अश्लिल व्हिडिओ कसा झाला व्हायरल?
शक्ती कायद्यासंदर्भात यापूर्वी मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यात आणखी सुधारणा अपेक्षित असून, लवकरच याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गृह विभाग आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
- डोंबिवली : ४० लाखांसाठी मुलाचे अपहरण; टाेळी जेरबंद
- लिएंडर-किम शर्मा यांचा लेट नाइट रोमान्स, डेटचा फोटो व्हायरल