किचन टिप्स- हिरवी मिरची ताजी ठेवण्यासाठी 'हा' आहे उपाय | पुढारी

किचन टिप्स- हिरवी मिरची ताजी ठेवण्यासाठी 'हा' आहे उपाय

* बदामावरील टरफल चटकन काढण्यासाठी बदाम 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा.

* साखरेच्या डब्यात 3-4 लवंगा टाकल्या, तर डब्याला मुंग्या चिकटत नाहीत.

* बिस्किटाच्या डब्याला कागद लावला, तर बिस्किटे बराच काळ फे्रश राहतात आणि नरम पडत नाहीत.

* कापलेले सफरचंद लवकरच काळे पडते. ते टाळण्यासाठी कापलेल्या सफरचंदावर लिंबाचा रस लावावा. म्हणजे ते बराच काळ काळे पडत नाही.

* कुठेही भाजले असेल, तर त्या ठिकाणी केळी कुस्करून लावावे. आराम मिळतो.

* अंडे ताजे आहे हे ओळखण्यासाठी ते मिठाच्या पाण्यात टाकावे. अंडे तळाला गेले तर ते ताजे आहे आणि ते वर तरंगत राहिले, तर शिळे आहे, हे ओळखावे.

* लसूण सहजपणे सोलता यावे, यासाठी ते पाण्यात भिजवावे आणि नंतर त्याचे टरफल काढावे. दुसरा उपाय असा की, लसणाला थोडेसे गरम करावे. सोलणे सोपे जाते आणि नखांना त्रास होत नाही.

* हिरवी मिरची जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तिची देठे काढून टाकावीत.

* मटार हिरवे राहण्यासाठी पॉलिथिनमध्ये बांधून फ्रिजमध्ये ठेवावे.

* तसे पाहिले, तर तंबाखू आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही; मात्र शरीराच्या एखाद्या अवयवात जास्त वेदना होत असेल, तर तो रामबाणाचे काम करतो. चघळण्याचा तंबाखू पाण्यात मिसळून वेदना होत असलेल्या ठिकाणी ठेवावा. नंतर कपडा किंवा पट्टी बांधावी. काही मिनिटांनंतर वेदना कमी होते.

* कडू कारले टेस्टी आणि क्रिस्पी बनविण्यासाठी ते मधोमध कापून अर्धा तास मीठ, पीठ आणि दह्यात ठेवावे.

* भांडे करपलेे असेल, तर त्यात कापलेले कांदे आणि गरम पाणी टाकून 5 मिनिटे ठेवावे आणि नंतर स्वच्छ करावे. भांडे चकाचक होईल.
मिरची पावडर खराब होऊ नये, यासाठी त्यात हिंगाचे पाकीट ठेवावे. मिरची पावडरमध्ये गाठी पडत नाहीत.

* भाजी कापण्यासाठी लाकडी बोर्डचा वापर करावा. त्यामुळे चाकूची धार खराब होत नाही. चुकूनही प्लास्टिक बोर्डचा वापर करू नका. कारण, त्याचे छोटे— छोटे तुकडे भाजीत जाण्याची भीती असते.

* कोथिंबीर किंवा पुदीना ताजा ठेवण्यासाठी ते मलमलच्या कपड्यात गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावे. फ्रेश राहते.

* डोशाचे मिश्रण बनविण्याआधी भिजलेल्या तांदळात अर्धा चमचा मेथी टाकली, तर डोसा आणखी कुरकुरीत होतो.

* कच्चा आंबा अथवा कोणतेही फळ पिकवण्यासाठी ते वृत्तपत्रात गुंडाळून एखाद्या गरम ठिकाणी ठेवावे. दोन- तीन दिवसांत फळे पिकतात.

* उरलेले अन्न फेकून देऊ नका. त्यापासून टेस्टी पदार्थ तयार करता येतात. भाजी उरली तर त्यापासून पराठे, उरलेली डाळ पिठात मिसळून भाकरी करता येते.

Back to top button