देशात गेल्या तीन वर्षांत एकूण 1 हजार 34 दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये एकूण 177 जवान शहीद झाले. त्यापैकी 1 हजार 33 हल्ले एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये झाले. तर, एक हल्ला दिल्लीत झाला. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. 2019 मध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या सर्वाधिक 594 घटनांची नोंद झाली. म्हणजेच 2019 मध्ये काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरही दहशतवादी घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही.
गेल्या वर्षी केंद्रशासित प्रदेशात 244 दहशतवादी हल्ले झाले होते, तर चालू वर्षात 15 नोव्हेंबरपर्यंत अशा 196 घटना घडल्या. दिल्लीतील अशाच एका घटनेचाही यादीत समावेश केल्यास 2019 ते 2021 (नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत) देशात अशा एकूण 1,034 घटना घडल्या आहेत.
2019 मध्ये 80, 2020 मध्ये 62 आणि चालू वर्षात (15 नोव्हेंबरपर्यंत) 35 जवान शहीद झाले. दुसर्या प्रश्नाच्या उत्तरात भट्ट म्हणाले की, सरकारने किनारपट्टी आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत यंदाच्या वर्षभरात म्हणजे 2021 या वर्षात पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 26 मृत्यू झाले आहेत
तर देशभरात 151 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे. महाराष्ट्राखालोखाल गुजरातमध्ये 21, बिहारमध्ये 18, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी 11 मृत्यू पोलिस कोठडीत झाले आहेत. खा. वरुण गांधी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
पोलिस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारचा विशेष कायदा अथवा नियमावली आणि कैद्यांच्या हाताळणीविषयी पोलिस अधिकार्यांना अधिक संवेदनशील बनविण्यासाठीचे धोरणाबाबत त्यांनी विचारणा केली होती. गत पाच वर्षांत सहा लाख लोकांनी देशाचेनागरिकत्व सोडले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 1 कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक विदेशात राहत आहेत,
असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. 2017 मध्ये 1 लाख 33 हजार 49 लोकांनी, 2018 मध्ये 1 लाख 34 हजार 561, तर 2019 मध्ये 1 लाख 44 हजार 17 लोकांनी नागरिकत्व सोडले. 2020 मध्ये 85 हजार 248 लोकांनी नागरिकत्वाचा त्याग केला. तर चालू वर्षी 30 सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार 1 लाख 11 हजार 287 लोकांनी नागरिकत्व सोडले आहे.