अजित पवारांच्या ओपन चॅलेंजला अमोल कोल्हे यांचे जोरदार प्रतिउत्तर.
पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क: अजित पवार यांनी दिलेल्या ओपन चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी सुद्धा ओपन चॅलेंजवर प्रतिउत्तर दिलं आहे. कोल्हे म्हणाले की अजित पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. अजित पवारांसारख्या नेत्यांनी मला चॅलेंज देणं हा मी माझा मोठा गौरव समजतो. तसेच ते पुढे म्हणाले की राजकीय भूमिका बदलल्याने अजित पवारांची माझ्यावर टीका होत आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे बोलले आहेत. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. शेतकरी प्रश्नी शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले. माध्यमांशी बोलतांना कोल्हे म्हटले की दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये अनुदान देऊन दिलासा देण्यात यावा. तसेच शेतकरी कर्ज माफीबद्दल ही सरकारने विचार करावा. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ असे बोलून त्यांनी आढळराव पाटील यांच्यावर सुध्दा टीकास्त्र साधले.
हेही वाचा