औरंगाबाद : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून; पती ताब्यात

औरंगाबाद : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून; पती ताब्यात

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगरातील घाणेगाव येथे एकाने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा लोखंडी सळई व बांबूच्या काठीने मारहाण करून खून केला. ही घटना आज (दि.८)सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी संतोष जाधव (३६ रा. संघर्षनगर, घाणेगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती संतोष प्रभाकर जाधव (३५) यास ताब्यात घेतले आहे.

याविषयी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले की, घाणेगाव येथील संघर्षनगर राहणाऱ्या संतोष जाधव याचा १७ वर्षापूर्वी विवाहित असणाऱ्या  लक्ष्मी या  महिलेसोबत प्रेमविवाह केला होता. लक्ष्मी हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी असून संतोषपासून तिला एक १४ वर्षाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून संतोष हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करुन तिचा छळ करत असे. याच कारणावरून आठ- दहा दिवसापूर्वी संतोषने पत्नीच्या डोक्याचे केस कापले होते. या प्रकारामुळे दोघा पती-पत्नी सतत वाद सुरु होता.

बुधवारी मध्यरात्रीनंतर संतोषने पत्नी लक्ष्मी हिला मुलगा आदर्श हा घरात असताना लोखंडी सळई व बांबूच्या काठीने पोटावर, डोक्यात बेदम मारहाण करून तिचा खून केला. पत्नी लक्ष्मी मयत झाल्याचे पाहून संतोषने त्याच्या आई-वडिलांना फोन करून पत्नीचा खून केल्याचे सांगितले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित, अशोक इंगोले, राहुल निर्वळ, शेकनाथ अधाणे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. यावेळी पोलीसांनी संशयावरून मयत महिलेच्या पती संतोषला ताब्यात घेतले आहे. या दरम्यान पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत सूचना दिल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news