औरंगाबाद : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Published on
Updated on

पाचोड : पुढारी वृत्तसेवा : वैवाहिक आयुष्याचे स्वप्न रंगवत महिनाभरापूर्वी लग्नाची रेशीमगाठ बांधलेल्या तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यामुळे हातातील मेहंदी सुकण्याआधीच वधूवर विधवा होण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ही घटना पैठण तालुक्यातील पाचोड खूर्द येथे आज (दि.७) उघडकीस आली. विजय बाबासाहेब घुले (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  विजय घुले याचे नुकतेच महिनाभरापूर्वीच थाटामाटात लग्न झाले होते. सर्व काही व्यवस्थित असताना  किरकोळ कारणावरुन विजय हा  मंगळवारी (दि.३) दुपारी रागाच्या भरात  घरातून बाहेर पडला . शांत स्वभावाचा असलेला विजय बाहेर गावी गेला असावा, असे घरातील व्यक्तींना वाटले. परंतु,  त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो  कोणत्याच नातेवाईकांकडे गेला नसल्याचे कळाले.

शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान गावालगतच्या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्याने गावातील काही तरुणांनी विहिरीकडे जाऊन पाहिले. यावेळी विहिरीत विजय याचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले.  या घटनेची माहिती गावचे उपसरपंच नितीन वाघ यांनी पोलीस पाटील दिलीप वाघ यांना कळविली. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच  त्यांनी तत्काळ घटनास्थळी  दाखल होत विहिरीतून विजयचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची अकस्मात नोंद पाचोड पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news