बीबीएम-३ : आता गायत्री – मीनल एकत्र आल्या! | पुढारी

बीबीएम-३ : आता गायत्री - मीनल एकत्र आल्या!

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या (बीबीएम-३) घरामध्ये आज रंगणार्‍या साप्ताहिक कार्यामध्ये सगळीच समीकरण बदलेली दिसणार आहेत. जय आणि गायत्री मधले नाते असो वा उत्कर्ष – जय मधली नाराजी असो. पण, टास्क म्हटलं की, सदस्य आपल्यातील भांडण विसरून एकत्र येतात. आजच्या “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामध्ये नक्की काय होणार ? कोण कोणाच्या विरोधात खेळणार ? कोणामध्ये राडे होणार ? संचालक फेयर खेळणार का ? कोणाचा डब्बा गुल होणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आता गायत्री – मीनल एकत्र आल्या आहेत. (बीबीएम-३) आज टास्क दरम्यान गायत्री – मीनल हिला सांगताना दिसणार आहे “असं नको व्हायला ते दोघेच खेळत आहेत. प्लीज डोन्ट लेट दॅट happen.”

आता गायत्री हे जय आणि उत्कर्षबद्दल बोलते आहे की, विशाल आणि विकासबद्दल आहे की कोणा दुसर्‍याबद्दल हे आज कळेलच. तर दुसरीकडे, जय नीथाला खेळ कसा पुढे जातो आणि कसा खेळावा असे सांगणार आहे.

जय नीथाला समजवताना दिसणार आहे- रिबिन तर कापायचीच आहे बॉक्सवरची, पण जर आपल्याकडे कमी आहे आणि त्यांच्याकडे जास्त तर “game is all about संचालक” संचालक ठरवणार approve करायचे की disapprove करायचे.

जर आपल्याकडे १० आहेत आणि त्यांच्याकडे १५ बॉक्स आहेत तर आपल्याला त्यांचे ५ आपल्याकडे आणायचे आहेत हा हेतु आहे. त्याच्यामध्ये खेचाखेची होणारं.

बघूया टास्कमध्ये पुढे काय होणार. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button