लष्कर-ए-तोयबा : श्रीनगरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा

लष्कर-ए-तोयबा : श्रीनगरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Published on: 
Updated on: 

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीर येथील श्रीनगरमधील दानमर भागातील अलमदार काॅलनीमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस हे ज्वाइंट ऑपरेशन राबवत आहे. त्या अतंर्गत परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. आज पहाटे भारतीय जवान आणि लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

अलमदार भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून सलगपणे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमकी सुरू आहेत.

दक्षिण काश्मीर पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये 'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अबू हुरैर याचाही समावेश होता. संबंधित घटनास्थळावरून शस्त्रास्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर येथे याआधी २ जुलै रोजी पुलवामामध्ये दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले. त्यानंतर ८ जुलै रोजी २ पाकिस्तानी दहशतवादी चकमकी दरम्यान मरण पावले. या ऑपरेशनमध्ये एक ज्युनियर कमिशन ऑफिसरसह २ जवान शहीद झाले. १२ जुलै रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये दादलच्या जंगलात जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं.
  • फुलाला मातीचा सुंगध फेम समृद्धी केळकरचे फोटो पाहिलेत का?

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news