लष्कर-ए-तोयबा : श्रीनगरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीर येथील श्रीनगरमधील दानमर भागातील अलमदार काॅलनीमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
- दहावी निकाल आज दुपारी; पहा एका क्लिकवर
- डब्ल्यूएचओ : ४० लाख लोकांचा जीव घेणारा कोरोना धारण करणार रुद्रावतार!
भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस हे ज्वाइंट ऑपरेशन राबवत आहे. त्या अतंर्गत परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. आज पहाटे भारतीय जवान आणि लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.
- सांगली जिल्ह्यात सव्वावर्षांनी शाळा सुरू, गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : भावेला रत्नागिरीला जाण्यास हायकोर्टाची परवानगी
अलमदार भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून सलगपणे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमकी सुरू आहेत.
- डायनासोर लघुग्रहाच्या धडकेनंतरच्या त्सुनामीत नष्ट झाले
- आर्टिफिशीयल इंटेलिजन्स देशाच्या विकासासाठी महत्वाचे : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
दक्षिण काश्मीर पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा कमांडर अबू हुरैर याचाही समावेश होता. संबंधित घटनास्थळावरून शस्त्रास्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
- फुलाला मातीचा सुंगध फेम समृद्धी केळकरचे फोटो पाहिलेत का?
मराठी मालिका अभिनेत्री समृद्धी केळकर हिच्याविषयी तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?
हे वाचलंत का?