सांगली : महागड्या खर्चाची द्राक्षे झाली मातीमोल
सोनी : संजय जाधव ; पराकोटीची प्रतिकूल परिस्थिती आणि मोठा खर्च करून पिकवलेली द्राक्षे आता मातीमोल दराने विकली जात आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेतला आहे. द्राक्ष भाव ठरवण्यासाठी नाशिक येथे उत्पादकांचा मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये द्राक्ष दर ठरविण्यात आले. त्या धर्तीवर जिल्ह्यात द्राक्षउत्पादकांचा मेळावा घ्यावा आणि दर निश्चिती करून द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत.
- Tikait Vs Tomar : राकेश टिकैत यांनी पुन्हा ‘शेतकरी आंदोलना’ची दिली धमकी
- मुस्लिम आरक्षणप्रश्नी नवाब मलिक दिशाभूल करत आहेत; प्रकाश आंबेडकर यांची टीका
आता द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. सातत्याने येणार्या विविध अडचणींचा सामना करून द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे. प्रामुख्याने महाग झालेली खते व औषधे, वाढलेले मजुरीचे दर, अत्यंत प्रतिकूल हवामान या गोष्टींमुळे द्राक्ष शेती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेऊन द्राक्ष विक्रीसाठी दर निश्चितीसाठी बैठक घेतली. लगेचच नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे द्राक्षउत्पादकांचा मेळावा घेतला.
- Ajinkya Rahane : ‘भारतीय क्रिकेट व्यवस्थेत सर्वात शक्तिमान अजिंक्य रहाणे!’, प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याने चाहते संतप्त
- Ajinkya Rahane : ‘भारतीय क्रिकेट व्यवस्थेत सर्वात शक्तिमान अजिंक्य रहाणे!’, प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याने चाहते संतप्त
प्रतिकिलो द्राक्षाला जानेवारीमध्ये 81, फेब्रुवारीमध्ये 71 तर मार्च मध्ये 61 रुपये किमान दर निश्चित केला आहे. या निर्णयाचे द्राक्ष उत्पादकांनी स्वागत केले आहे.सध्या सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यांमध्ये ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. येथील द्राक्ष ही उत्तम प्रतीची आहेत. पण दलालांच्या मनमानीमुळे कवडीमोलाने द्राक्ष विकली जात आहेत. याचा उत्पादकांना मोठाच आर्थिक फटका बसू लागला आहे.
हेही वाचा;
- मुस्लिम आरक्षणप्रश्नी नवाब मलिक दिशाभूल करत आहेत; प्रकाश आंबेडकर यांची टीका
- solapur MNC : मजुरांच्या मृत्यूप्रकरणी मनपा, दास ऑफशोअर, व्रज कन्स्ट्रक्शन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरुद्ध गुन्हा दाखल
- राज्यात टीईटीपेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा, थेट भरती बंद असताना नेमले हजारो शिक्षक
- udyanraje vs shivendraraje : उदयनराजेंची टीका ‘काय बाई सांगू कसं गं सांगू’ यावर शिवेंद्रराजे म्हणतात, गळ्यात पडायचं पप्या घ्यायचं…
- मुलांचे लसीकरण नको; वैद्यकीय तज्ज्ञांनी मोदींना ट्विट टॅग करून नोंदवला आक्षेप