शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला : चंद्रकांत पाटील | पुढारी

शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला : चंद्रकांत पाटील

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे. शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे, हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. पेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार आ. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राहुल महाडीक, सी.बी.पाटील, सम्राट महाडीक, संग्राम देशमुख, सत्यजीत देशमुख उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकांत भाजपने २१ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप राज्यात १ नंबरचा पक्ष झाला आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीला १७ जागा मिळाल्या तर शिवसेनेला केवळ १२ जागाच मिळाल्या. मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने आपला पक्षच संपविला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे. तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाही. असो; हा त्यांचा प्रश्न आहे. यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचलं का?

Back to top button