सांगली : धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने कोणीकोनूरात तरुणाने जीवन संपवले | पुढारी

सांगली : धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने कोणीकोनूरात तरुणाने जीवन संपवले

जत, पुढारी वृत्तसेवा : आबाचीवाडी – कोणीकोनूर (ता.जत) येथे एका तरुणाने धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवले आहे. बिरुदेव वसंत खर्जे (व.४१ रा. आबाचीवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.२२) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बिरुदेव गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने खंत व्यक्त करत होता. तशी त्याच्या खिशात चिट्ठी सापडली आहे. पोलीस यंत्रणांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षणास मिळावे अशी धारणा बिरदेव होती. तो आरक्षण लढाईच्या सदर्भांत सातत्याने समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चा प्रसारित वार्तांकन वाचत असायचा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने चर्चा करत होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून एकांतात व नैराश्यात वावरत होता. रविवारी आरेवाडी बन येथे धनगर समाजाचा आरक्षण मेळावा सुरू होता. याचवेळी शेतात त्याने जीव गमावला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button