सातारमध्ये भीषण अपघात : कोल्हापूरातील दोन तरुण ठार
कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : सातारमध्ये भीषण अपघात : लग्नासाठी साताऱ्यात गेलेल्या कोल्हापूर येथील दोन तरुणांचा भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून ३० फूट खोल ओढ्यात कार गेल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारमध्ये भीषण अपघात
सातारा येथे बुधवारी होणाऱ्या लग्नासाठी कोल्हापुरातून तीन तरूण खासगी गाडी (एम एच ०९ एफ बी ६७८०) तून मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास सातारकडे गेले होते.
'कास पठार' येथे वर्षा पर्यटनानंतर जेवण करून परतत असताना रात्री एकच्या सुमारास पोवई नाका ते मानसी प्राईड हॉटेल दरम्यान न्यायालय इमारती अलीकडे ३० फूट ओढ्यामध्ये कार गेल्याने अपघात होऊन तीन मुले गंभीर जखमी झाली.
उपचारासाठी त्यांना सातारा डायग्नोस्टिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय २३) रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर, आदित्य प्रताप घाडगे (वय २३) रा. कसबा बावडा मयत झाले आहेत. देवराज अण्णाप्पा माळी (वय २१) रा. कसबा बावडा हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचलं का?

