कोणत्याही जलतरण तलावाचे मुख्य उत्पन्न हे तलावावर येणार्यांकडून मिळणारे प्रवेश शुल्क हेच असते. मात्र गेल्या अकरा वर्षांपासून प्रवेशशुल्क वाढ झालीच नाही. याउलट तलावाच्या भाड्यामध्ये तिपटीने वाढ झाली, जीवरक्षकांचे पगार, लाईट बील, केमिकल खर्च, क्लोरिन सिलेंडर, देखभाल-दुरुस्ती खर्च, पाणी दर, वॉचमन, साफसफाई हे खर्च तिपटीने वाढले आहेत. काही वेळा तलावावर पाणी विकत आणावे लागते त्याचा खर्च आणखी वेगळा असतो.त्यामुळे जलतरण तलाव चालवताना उत्पन्न कमी खर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली असून तलाव चालवणे अतिशय जिकरीचे होत चालले आहे.