नाशिक : पुढारी वृत्तसेवा : प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात (नाशिक मनपा) 'कही खुशी, कही गम' असे चित्र असताना खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनाही त्याचा प्रत्यय आला आहे. महापौरांच्या सध्या असलेल्या प्रभाग क्रमांक २३ मधून बजरंगवाडी हा महत्त्वाच्या परिसरालाच कात्री लागल्याने सुमारे चार ते साडेचार हजार इतक्या हक्काच्या मतांना दुरावे लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी (दि.१) नाशिक मनपा प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा जाहीर केला. या रचनेनुसार बहुतांश सर्वच प्रभागांना कात्री लागली असून, झालेल्या फेरबदलांमध्ये नवीन परिसर जोडले गेले आहेत. यामुळे अनेक नगरसेवकांना नव्या परिसरातील मतदारांशी संपर्क साधताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातून महापौर सतीश कुलकर्णी हेदेखील सुटलेले नाही.
महापौरांचा सध्याच्या असलेल्या प्रभाग क्रमांक २३ मधून बजरंगवाडी हा परिसर तुटला गेला असून, नव्याने खोडेनगर, साईनाथनगर, अमृतवर्षा कॉलनी, जयदीप कॉलनी, मिन्नतनगर, निसर्ग कॉलनी हा नवा परिसर जोडला गेला आहे. यासंदर्भात महापौर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नव्याने रचना झालेल्या प्रभागाविषयी समाधान व्यक्त करत जुना प्रभाग तुटला गेला असला तरी मी या भागात २५ वर्षांपासून नगरसेवक असल्याने काहीही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार महापौरांच्या प्रभागाचा क्रमांक २८ झालेला आहे.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा :