उत्तर महाराष्ट्रातील गारपीटग्रस्तांसाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर
उत्तर महाराष्ट्रात एप्रिल-मेमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी साडे आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासनाने यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रात मार्च ते मे २०२१ दरम्यान मोठ्या प्रमाणात केळी तसेच अन्य पिकांचे नुकसान झाले होते.या विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले होते. सर्वाधिक नुकसान जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात झाले होते. या नुकसानीपोटी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या नियमानुसार मदत देण्याची मागणी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे केली होती.
एसबीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार शेती आणि बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरिता ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांनाही मदत मिळते. प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेला पंचनामा तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप केले जाणार आहे. ही रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कोणलाही रोख मदत करण्यात येणार नाही. मदतीची रक्कम खात्यावर थेट जमा करताना मदतीचा रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
विभागीय आयुक्तांनी मागणी केल्यानुसार साडे आठ कोटी रुपयांचा निधी अशा प्रकारे वितरित करण्यात येईल. जिल्हानिहाय निधी कंसात रक्कम जळगाव ( ६ कोटी ६६ लाख ), नाशिक (१ कोटी ८४ लाख ), धुळे ( २ लाख ८८ हजार ), नंदुरबार ( १ लाख ६५ हजार रुपये ), अहमदनगर (१ लाख ६० हजार ).
हेही वाचलं का?
- इंदुरीकर महाराज, “मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”
- ‘Dating Site वर ओळख आणि चार दिवसांतच सेक्स, प्रकरण आले अंगलट’
- Accident : नाशिक-मुंबई महामार्गांवर अपघात; दोघांचा मृत्यू, २ जखमी