देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )
देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )

मविआ काळात पीकविमा कंपन्यांना सर्वात जास्त फायदा मिळाला : देवेंद्र फडणवीस

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस यांनी फुलेंचं योगदान मोठं असल्याचे यावेळी म्हटले. फडणवीस पुढे म्हणाले- 'कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद उपस्थित होता काम नये. आम्ही जे बोलतो ते करतो. कोविड काळात मविआ सरकारने एका पैशाची सूट दिली नाही. रब्बी काळात वीज कनेक्शन न तोडण्याची सूचना आम्ही दिली. दोन्ही राज्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा.

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. सत्ता जाताच विमा कंपन्यांवर मोर्चा काढतात. मविआ काळात पिकविमा कंपन्यांना सर्वात जास्त फायदा मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news