![file photo](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2F%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकांवरून महाराष्ट्रात मोठे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना संजय राऊत म्हणाले, की पहिल्या फेरीतच आमचे चारही आमदार जिंकतील. या विजयाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसेल.
ते पुढे असेही म्हणाले, निवडणुकीत चुरस आहे हा भ्रम आहे, आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या आहेत. आजही आघाडीत समन्वय आहे, कोणतेही मतभेद नाहीत. आजच माझी शरद पवारांशी माझी चर्चा झाली.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानावरुन माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनाही मतदान करण्याचा पुर्ण अधिकार आहे.
हेही वाचलंत का ?