Nawab Malik : नवाब मलिक यांची 'ईडी' कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटक कारवाईविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. यापूर्वी मलिक यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने ‘ईडी’ची कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले होते.
- Sri Lanka economic crisis : श्रीलंकेच्या मदतीला भारत धावला! ४० हजार टन तांदूळ पाठविण्याची तयारी सुरु
२३ फेब्रुवारी रोजी ईडीने केली होती अटक
दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतरही सत्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयाने कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.
उच्च न्यायालयाने कारवाई ठरवली होती योग्य
मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.
हेही वाचा:
- पुढील ४-५ वर्षात भारतात १० लाख नोकऱ्यांची निर्मिती; शेफ आणि योग प्रशिक्षकांना मोठी संधी!
- विल स्मिथनं दिला ऑस्कर सदस्यत्वाचा राजीनामा, म्हणाला- परिणाम भोगायला तयार
- आता मिटणार मोबाईल चार्जचं टेन्शन; Samsung Galaxy M33 5G आज भारतात लाँच