कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या
कोडोली; पुढारी वृतसेवा : स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने नैराश्येतून गजानन धोंडिराम गुरव (वय 23, रा. जाखले, ता. पन्हाळा) या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने तरूणाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- priyanka gandhi : ‘गुन्हा दाखल नसतानाही मी २८ तासांनंतरही पोलिसांच्या ताब्यातच’
- Drugs Case : शाहरुखच्या आधी ‘या’ सुपरस्टारचा मुलगा गेला होता जेलमध्ये!
- शिवसेना म्हणते, “जय जवान, जय किसानचे नारे कशासाठी द्यायचे?”
जाखले येथील गजानन गुरव याने तीनवेळा स्पर्धा परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला अपयश आले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेत गजाननाला दोन विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने तो चार दिवसांपासून नाराज होता.
- server down whats app facebook instagram तब्बल ६ तास ‘डाऊन’; भारतातील ५३ कोटी युजर्संना फटका
- मुंबई : इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाने केला पाकच्या मदतीने साम्राज्यविस्तार
- बॉलिवूड किंग शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात!
या नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. त्याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.