जालना: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

जालना: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : परतीच्या पावसात वीज अंगावर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील सरफगव्हान येथे आज (दि.14) सकाळी घडली. तुकाराम काळे (वय 45) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. काळे शेतात पीक पाहण्यासाठी गेले होते. दुपारी 12 च्या सुमारास त्यांचावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button